Tuesday, June 28, 2016

अतृप्त



मन सारखं कुढत राहतं
तुला  भेटायला बोलवावं,  की नको बोलवावं म्हणून
एकटंच स्वतःशी भांडत राहतं

कधी कधी विचार येतो
तुलापण मला भेटावं,  असं वाटत  असेल का?
प्रेम नाही पण तीच ओढ
अजून तुझ्यात  शिल्लक राहिली असेल का?

ह्या शापित  आयुष्याचा गळा घोटावा,
असे वाटत असून ही मी आयुष्याचा तमाशा  बघत आहे,
कारण एकदा तरी  तू "इथं " भेटशील ,
माझ्याशी आपुलकीनं बोलशील,
मला माफ करशील  अशी आजही आशा आहे.

पण वेडे, जास्ती वेळ  लावू नको,
एकेकाळी तुज्यावर अधिराज्य गाजवणारा मी,
आता  तुझी वाट पाहून
पाहून थकलोय,
एवढ्या वर्ष्याने आता तुझा चेहराही मी विसरलोय,

हे शेवटचं बोलवणं समज ,
जर वाटलेच भेटावे तर,
पूवीच्या आपल्या भेटायच्या ठिकाणी नक्की ये,
मी तिथेच तुझी वाट पाहत,
गुलमोहरच्या झाडाखाली बसलेला दिसेन,

मग मला,
शेवटचा स्पर्श कर आणि
हळूच मिठीत घे. 
डोळे बंद होण्याआधी तू  आली आहेस,    
एवढी आठवण करून दे.

मग बघ, मी म्हणाल्या प्रमाणे
तुझी माझी ती शेवटचीच भेट असेल,
तुझ्या सोबत असून ही, तेव्हा मी तुझ्या सोबत नसेल.
 
तू आज ये, उद्या ये, वर्ष्याने ये, सात जन्माने ये 
मी इथेच तुला भेटेन,
नाही आलीस तर, जीव मात्र तसाच तेवत ठेवेन
 
आयुष्यभर झालेल्या कोंडमार्यावर
 शेवटची  फुंकर मारून  जा,
नाही म्हणू नकोस ,
शेवटी सोबत 'आपल्या' आठवणी देऊन जा.



  

No comments:

Post a Comment