Saturday, April 2, 2016

पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर 




पाऊस पडून गेल्यावर,
लक्षात राहते, ती चिंब भिजलेली माती,
कितीही नाही म्हणले तरी,
ओलावते मनातील गोठवलेली नाती,

पाऊस पडून गेल्यावर, 
थंडगार बोचरी हवा अंगात शिरू पाहते,
कितीही नाही म्हणले तरी,
कुठल्यातरी आठवणींशी, एकटीच खेळू पाहते. 

पाऊस पडून गेल्यावर, 
खिडकीतून बाहेर बघत, एकटाच उभा राहतो,
 भिजलेले पक्षी, झाडे, घरे बघून,
आतल्या आत मी हि, भिजून जातो. 

पाऊस पडून गेल्यावर, सगळ कसं बहरून येतं,
मग,
 मन स्वतालाच ओढत, घराबाहेर घेऊन जातं,

रंगबेरंगी फुलपाखरे, झरझरणार पाणी, 
मातीचा सुगंध, पक्ष्यांची मधुर गाणी,
असं सगळं बघून, मन गायला लागतं, 
मधेच, गवती चहाची तल्लब होते,
आणि सोबत, गरम भजी मागायला लागत. 

पाऊस पडून गेल्यावर,  
सगळेच हळूहळू बाहेर पडतात ,
माझ्यासारखेच इतर हि चार लोक,
 टपरीवर जमायला लागतात. 

दरवर्षी मृगाचा घनं, असाच गोंधळ घालतो,
मागील वर्षी घालवलेले क्षण, 
पुन्हा तसाच, सोबत घेऊन येतो,

पुन्हा त्याच आठवणीच डबक, परत भरून येतं ,
आणि, मन पुढच्या पाउसाची, 
 परत वाट बघायला लावत. 

                                     …… नितीन माळी








No comments:

Post a Comment